श्रीरामपुर: तालुक्यातील कमालपूर येथे दीपावली पाडव्याच्या दिवशी सायंकाळी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी ग्रामस्थ व युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवकांना बहुमोल मार्गदर्शन केले. तर पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धिर दिला.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आलेल्या दिवाळी सणावर अवकाळी पावसाचे सावट होते. शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने कमालपूर मधील शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. सोयबीन, कापूस, बाजरी, मका यांसह अनेक पिके हातातोंडाशी आलेली असतानाच अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.

या व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी गावातील युवक तसेच शेतकरी वर्गाशी संवाद साधला. नोकरी व व्यावसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असणारे अनेकजण दिवाळीनिमीत्त गावी आलेले होते. त्यांच्याशीही विविध विषयांवर मुरकुटे यांनी चर्चा केली.
- 8 जानेवारीपासून हवामानात मोठा बदल, काही भागात कडाक्याची थंडी अन् काही भागात धो धो पाऊस; वाचा हवामान खात्याचा अंदाज
- HDFC Life, डाबर इंडियासह ‘हे’ 3 शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न! टॉप ब्रोकरेज हाऊसकडून मिळाली बाय रेटिंग
- 60 टक्क्यांची घसरण झालेल्या ‘या’ शेअर्समध्ये आशिष कचोलियांची मोठी गुंतवणूक ! आता शेअर्समध्ये आली तुफान तेजी
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! किमान पेन्शनमध्ये तब्बल पाचपट वाढ होणार, प्रस्तावाला लवकरच मिळणार मंजुरी
- मकर संक्रांतीच्या दिवसापासून ‘या’ राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार ! हातात येणार भरपूर पैसा, गाडी अन बंगल्याचे स्वप्न पण पूर्ण होणार













