अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर, कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिल्ह्यात भाजपचे निवडून आलेले तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही. त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांनी केली आहे.
गेंट्याल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
गेंट्याल यांनी म्हटले आहे, जिल्ह्यात पहिला भगवा नगर शहर आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये फडकला. पाठोपाठ राहुरीच्या पोटनिवडणुकीत आणि पारनेरमध्येही भगवा फडकला. परंतु आता तिन्ही मतदारसंघांत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला असून त्याची कारणे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

निवडून आलेले तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आले आहेत. सध्या मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिले नाही. हा विषय गंभीर आणि चिंतनाचा, तसेच चिंतेचा आहे. हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई देशात आणि राज्यात हिंदुत्वाचेच सरकार असावे, असे कार्यकर्त्यांना नेहमीच बजावत आले आहेत.
त्यासाठी भाजप आणि शिवसेनेला नवसंजीवनी देण्याची गळ आपण घालत असल्याचे गेंट्याल यांनी म्हटले आहे. विधान परिषद सभासदत्व आणि महामंडळांवर एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षांना नवसंजीवनी द्यावी, अशी गेंट्याल यांची मागणी आहे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! ‘हे’ शेतकरी राहणार कर्जमाफी पासून वंचित
- आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यू
- फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठा निर्णय ! Home Loan आणखी स्वस्त होणार
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! उन्हाळी हंगामासाठी 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे
- जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका किती वाढणार ? समोर आली आकडेवारी













