हैदराबाद : तेलंगणामध्ये भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या राड्यात तिघे जण जखमी झाले आहेत. तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात हा राडा झालाय.
कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या अजयचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील इंद्रजासोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात लग्नाची वरात काढण्यावरुन त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.

सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. कोदाद ग्रामीण पोलिस स्टेशनचे सर्कल निरीक्षक शिवा राम रेड्डी यांनी ही माहिती दिली.
पोलिस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी तीन वऱ्हाडी जखमी झालेले होते. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लग्नानतर दोन्ही बाजूचे नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये आले. अजय आणि इंद्रजा या जोडप्यामध्ये कुठलेही वाद नसून ते एकत्र राहत आहेत. त्यामुळे आम्हाला तक्रार नोंदवायची नाही, असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं.
- Pan Card सुद्धा एक्स्पायर होत का ? काय सांगतात पॅन कार्डचे नियम ? वाचा सविस्तर
- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट गुंतवणूकदारांना मिळणार मोठी भेट! ‘ही’ कंपनी देणार मोफत शेअर्स
- MPSC चा आत्ताचा सर्वात मोठा निर्णय ! ‘या’ परीक्षेसाठी वयोमर्यादेत मिळाली शिथिलता, कोणाला मिळणार लाभ?
- सरकारी कर्मचाऱ्यांची 2021 पासूनची मोठी मागणी मान्य होणार ! सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याचा तयारीत , कर्मचाऱ्यांना काय लाभ मिळणार ?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! आठव्या वेतन आयोगात ‘हे’ 5 प्रकारचे भत्ते वाढवले जाणार













