मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.

यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.
राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले असतानाही राज्यात नव सरकार स्थापन झालेलं नाहीये.
निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने ५६ जागां जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडे गेल्या आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! ‘हे’ शेतकरी राहणार कर्जमाफी पासून वंचित
- आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यू
- फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठा निर्णय ! Home Loan आणखी स्वस्त होणार
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! उन्हाळी हंगामासाठी 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे
- जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका किती वाढणार ? समोर आली आकडेवारी













