मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १५ दिवस उलटले असतानाही महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण का देत नाहीत? असा थेट प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १५ दिवस उलटले तरी नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांना तूर्त काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण असं आहे.

- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













