अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पुलात बाधीत होणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांना २५ नोव्हेंबरपर्यंत हमीपत्र भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून दिल्यामुळे मालमत्ताधारकांना सुमारे २५ टक्के आर्थिक नुकसान टाळता येणार आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दिली.
उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेतील मालमत्ताधारकांची बैठक खासदार विखे यांनी बोलावली होती. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता दिवाण आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, मालमत्ताधारकांशी चर्चा झाली आहे. शासनाने अधिग्रहण केले, तर मालमत्ताधारकांचे २५ टक्के आर्थिक नुकसान होणार होते. मालमत्ताधरकांनी जर हमीपत्र भरून दिले, तर हे नुकसान टाळता येणार आहे. त्यामुळे मी चर्चा केली.
उड्डाणपुलाच्या संपादनात सुमारे २१ जणांची ४ हजार ६५५ चौरस मीटर जागा बाधित होणार आहे. शासकीय जागा २८८८ चौरस मीटर आहे. याव्यतिरिक्त लष्कराच्या हद्दीतील सुमारे ६७०० चौरस मीटर जागाही संपादित करावी लागणार आहे. तातडीने पुलाचे काम सुरू करण्यासाठी बायपासचेही मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
मी का वाईट होऊ ?
नगरचे राजकारण कळत नाही, असे मी म्हणायचो, पण विधानसभेनंतर मला कळले आहे की येथे सगळेच आतून गोड आहेत. त्यामुळे मी तरी कशाला वाईटपणा घेऊ, असे वक्तव्य करत अंतर्गत विरोधकांनाही डॉ. सुजय विखे यांनी टोला लगावला.
- महाराष्ट्रातील ‘या’ 11 रेल्वे स्थानकांमधून नवीन रेल्वेगाडी ; ओडिशा आणि गुजरातला जोडणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ
- 1600 रुपयांचा स्टॉक एका दिवसात 1500 रुपयांवर ; मुकेश अंबानीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये आठ महिन्यातील सर्वात मोठी घसरण, कारण…
- ण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! पुण्यातून 60 नवीन लोकल गाड्या सुरू होणार, रेल्वेचा मेगाप्लॅन काय सांगतो?
- महाराष्ट्रातील ‘या’ घाट विभागात तयार होणार नवीन स्वतंत्र मार्ग !
- भारतात 2026 मध्ये 100% दुष्काळ पडणार….! मार्च महिन्यातच हवामान बदलणार , युरोपातून समोर आला नवीन अंदाज, वाचा सविस्तर













