अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, जनादेश महायुतीला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांनी सत्ता स्थापन करायला हवी होती. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री व कमी जागा असेल त्यांचा उपमुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते, पण हा निर्णय शेवटी वरिष्ठांचा असतो.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
- Pan Card सुद्धा एक्स्पायर होत का ? काय सांगतात पॅन कार्डचे नियम ? वाचा सविस्तर
- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट गुंतवणूकदारांना मिळणार मोठी भेट! ‘ही’ कंपनी देणार मोफत शेअर्स
- MPSC चा आत्ताचा सर्वात मोठा निर्णय ! ‘या’ परीक्षेसाठी वयोमर्यादेत मिळाली शिथिलता, कोणाला मिळणार लाभ?
- सरकारी कर्मचाऱ्यांची 2021 पासूनची मोठी मागणी मान्य होणार ! सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याचा तयारीत , कर्मचाऱ्यांना काय लाभ मिळणार ?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! आठव्या वेतन आयोगात ‘हे’ 5 प्रकारचे भत्ते वाढवले जाणार













