अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, जनादेश महायुतीला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांनी सत्ता स्थापन करायला हवी होती. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री व कमी जागा असेल त्यांचा उपमुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते, पण हा निर्णय शेवटी वरिष्ठांचा असतो.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! ‘हे’ शेतकरी राहणार कर्जमाफी पासून वंचित
- आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यू
- फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठा निर्णय ! Home Loan आणखी स्वस्त होणार
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! उन्हाळी हंगामासाठी 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे
- जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका किती वाढणार ? समोर आली आकडेवारी













