‘…अन्यथा या अनर्थास मनपा जबाबदार असेल’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  पावसाळ्यामध्ये शहरातील काही भागांमध्ये नेहमीच पाणी शिरण्याच्या तक्रारी समोर येत असतात. या गोष्टीला मनपाचे कामकाजाचे नियोजन तसेच इतर काही नैसर्गिक गोष्टीही कारणीभूत असतात.

याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे मनपा कायमच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील गायब झालेले नैसर्गिक ओढे, नाले शोधावेत अन्यथा भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील,

आणि या अनर्थास जबाबदार पालिका असेल असे, नगरसेवक योगीराज गाडे यांनी म्हटले आहे. 30 वर्षापूर्वीपासून असणारे नैसर्गिक ओढे नाले गायब झाले आहेत.

त्यामुळेही नागरिकांच्या घरात पाणी घुसत आहे. मनपाने त्या ओढ्यानाल्यांचा शोध घ्यावा असे ही ते म्हणाले. प्रभाग क्र. चार गुलमोहर रोड येथील दळवी मळा,

गणेश कॉलनी व पारिजात चौक परिसरातील कॉलनीमध्ये व रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे तळे साचत आहे. या ठिकाणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी स्वखर्चातून जेसीबीच्या सहाय्याने काम हाती घेतले असून नागरिकांच्या समस्या दुर केल्या आहेत

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment