उजनी १०१ टक्के भरले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  संपूर्ण ऑगस्ट महिन्यात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी हे धरण जीवनरेखा समजले जाते.

यामुळे ऊस उत्पदक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे. उजनी धरण सोमवारी १०१.३३ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

संपूर्ण वर्षभर वरील तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास पन्नासपेक्षा अधिक साखर कारखाने, पंधरा औद्योगिक वसाहती, अनेक नगर परिषदा, महानगरपालिका व गावांना या उजनीच्या पाणलोट क्षेत्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो.

धरणाच्या पाण्यावर लाखो शेतकरी कुटुंबे, शेतमजूर आणि उद्योजकांचा प्रपंच अवलंबून आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना,

कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने ही धरणे भरली असून, धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे सोमवारी उजनी धरण १०० टक्के भरले.

उजनी धरणाची सद्य परिस्थिती एकूण पाणीपातळी ४९६.९०० मीटर एकूण पाणीसाठा ३३४३. ६२ दलघमी (एकूण पाण्याचा टीएमसी ११८.०७) उपयुक्त पाणीसाठा १५४०.८१ दलघमी (उपयुक्त पाण्याचा टीएमसी ५४.४१)

एकूण उजनी धरण भरलेली टक्केवारी १०१.५६ टक्के ………………………………………………………….. उजणीतून सोडलेला विसर्ग सिना – माढा उपसा सिंचन – २६२ क्युसेक भीमा सिना बोगदा – ९०० क्युसेक मुख्य कॅनॉल

– ८०० क्युसेक मागील वर्षी ऑगस्ट सुरुवातीला उजनी धरण १०० टक्के भरून विसर्ग चालू होता. यंदा मात्र उजनी शंभर टक्के भरण्यास ऑगस्टअखेर उजाडला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment