महाविकास सरकारने ‘ह्या’ मतदारसंघासाठी ३८.४४ कोटची भरपाई केली मंजूर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-अतिवृष्टीने खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून महाविकास सरकारने मतदारसंघासाठी ३८.४४ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही तालुक्यात नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती.

मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती माजी आमदार चंद्रशेखर घुले व केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॕॅड. प्रताप ढाकणे यांनी दिली.

परतीच्या पावसाने शेवगाव व पाथडीॕ तालुक्यातील अनेक गावांतील शेतीपिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेल्या पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.

मतदारसंघातील या परिस्थितीची माहिती पालकमंत्री यांना देऊन नुकसानीची पाहणी मागणी केल्यानुसार पाहणी दौरा झाला. दुष्काळी भागात अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे करून

अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.दोन्ही तालुक्यातील जवळपास ७६ कोटी ५० लाख रुपयांच्या नुकसानीचे अहवाल सादर करण्यात आला आहे.

त्याचा मदत अनुदानाचा पहिला टप्पा ३८.४४ कोटी रूपये (शेवगावसाठी २४ कोटी २३ लाख, तर पाथर्डीॕसाठी १४ कोटी २१ लाख.) प्राप्त झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment