नवी दिल्ली :- संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची शक्यता आहे. या नव्या मंत्र्यांमध्ये मित्रपक्षांच्या मंत्र्यांचा मोठ्या संख्येने समावेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या वर्षी 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांचा पंतप्रधान झाले. यावेळी मोदीं यांनी बनविलेल्या नव्या मंत्र्यांच्या टीममध्ये जेडीयू पक्षाचा एकही मंत्री नव्हता.
यासोबतच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला देखील एक प्रकारे प्रतिकात्मक प्रतिनिधीत्व मिळाले होते. मित्रपक्षांच्या कोट्यामधून आणखी काही मंत्र्यांची वर्णी मंत्रिपदावर लागू शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आपल्या दुसऱ्या कार्यकालात मंत्र्यांनी आतापर्यंत किती काम केले. या सर्व कामांची समीक्षा करणार आहेत. या आधारावर मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- Ahilyanagar Kotwal Jobs 2025: अहिल्यानगर जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या 158 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली लग्नाचा विषय निघाला की लगेचच पळ काढतात ! स्वभाव कसा असतो?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता समवेत ‘हे’ 3 भत्ते वाढणार !
- श्रावण महिन्यात तुळशीला मंजिरी येण्याचा अर्थ काय?, यामागील शुभ संकेत समजून घ्या!
- पुणे – अहिल्यानगर प्रवास फक्त 90 मिनिटात ! महाराष्ट्रात तयार होणार 11,000 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?