अहमदनगर ;- महानगर पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा सभागृहाचा दोन वर्षापुर्वी ठराव झालेला असताना पुतळा तातडीने बसविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार वाकळे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह 11 शिवप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
सदर पुतळ्याचे काम प्रगतीपथावर न आल्यास 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा चारही नगरसेवकांनी दिला आहे. मागील दोन वर्षापुर्वी महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास मनपाच्या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे.

मात्र त्याच्या परवानगीसाठी एवढा मोठा कालावधी निघून गेला आहे. माजी उपमहापौर छिंदम याने वादग्रस्त वक्तव्याने शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याचवेळी महापालिकेत पुतळा बसविण्याची मागणी करण्यात आली होती.
या संदर्भात सर्व नगरसेवकांनी ठराव देखील मंजुर केला होता. या ठरावाची अंमलबजावणी अद्यापि झाली नसल्याचे कुमार वाकळे यांनी निदर्शनास आणून दिले. सदर पुतळा बसविण्याची कार्यवाही न झाल्यास चारही नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
- 7वा वेतन आयोगासारखं 8व्या आयोगात होणार नाही ! कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणारच नाही ? सरकारच्या भूमिकेने कर्मचारी चिंतेत
- 2026 मध्ये चांदीची किंमत अडीच लाख रुपये प्रति किलो होणार ? तज्ञांचा अंदाज काय सांगतो
- महाराष्ट्रातील ‘हे’ दोन जिल्हे जोडणारा नवीन रेल्वेमार्ग तयार होणार ! नव्या प्रकल्पाचा 30 लाख नागरिकांना होणार फायदा
- पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार, मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली अपडेट
- राज्यातील लाडक्या बहिणींसाठी चिंताजनक बातमी ! नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार, कारण काय ?













