अहमदनगर ;- महानगर पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा सभागृहाचा दोन वर्षापुर्वी ठराव झालेला असताना पुतळा तातडीने बसविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार वाकळे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह 11 शिवप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
सदर पुतळ्याचे काम प्रगतीपथावर न आल्यास 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा चारही नगरसेवकांनी दिला आहे. मागील दोन वर्षापुर्वी महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास मनपाच्या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे.

मात्र त्याच्या परवानगीसाठी एवढा मोठा कालावधी निघून गेला आहे. माजी उपमहापौर छिंदम याने वादग्रस्त वक्तव्याने शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याचवेळी महापालिकेत पुतळा बसविण्याची मागणी करण्यात आली होती.
या संदर्भात सर्व नगरसेवकांनी ठराव देखील मंजुर केला होता. या ठरावाची अंमलबजावणी अद्यापि झाली नसल्याचे कुमार वाकळे यांनी निदर्शनास आणून दिले. सदर पुतळा बसविण्याची कार्यवाही न झाल्यास चारही नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
- Airtel यूजर्ससाठी बंपर ऑफर! नेटफ्लिक्स, प्राईम मोफत…आणि दररोज 3GB डेटा; 84 दिवसांचे स्वस्त प्लॅन्स झाले लाँच
- अवघ्या 30 सेकंदात संपूर्ण शहर होऊ शकतं राख, ‘या’ देशाकडे आहे जगातील सर्वात विध्वंसक अणुबॉम्ब!
- फक्त पैशासाठी भगवंताचं नाव घेतलं तर…; प्रेमानंदजी महाराजांचे शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतात!
- पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात, कोणत्या टाळाव्यात? निरोगी आरोग्यासाठी वाचा या टिप्स!
- घरात ‘ही’ वनस्पती चुकूनही लावू नका, वास्तुशास्त्र सांगतं या वनस्पतीमुळे नशिबावर होतो परिणाम!