अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- एटीएममधून व्यवहार करताना बरेच वेळा ट्रांजेक्शन फेल होतात. ट्रांजेक्शन फेल झाल्यानंतर बँक खातेधारकाच्या खात्यातून पैसे वजा केले जातात परंतु एटीएममधून पैसे काढले जात नाहीत.
अशा परिस्थितीत खातेदारांना काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही. डिजिटल व्यवहारादरम्यानही ग्राहकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांना यासंदर्भात कठोर सूचना केल्या आहेत ज्या अंतर्गत ग्राहकांना त्यांचे ट्रॅन्जेक्शन फेलचे पैसे वेळेवर न दिल्याबद्दल बँकेला दंड भरावा लागतो.
आरबीआयच्या नियमांनुसार बँकांना खातेदाराकडे सात दिवसांत पैसे ट्रान्सफर करावे लागतात. जर तसे केले नाही तर ग्राहकाला बँकेकडून दररोज 100 रुपये भरपाई दिली जाते.
अर्ज कसा करावा ? :- अर्ज करण्यापूर्वी काही अटी खातेदारांना लागू होतात. उदाहरणार्थ, ट्रांजेक्शन फेल झाल्याच्या 30 दिवसांच्या आत बँकेत अर्ज करावा लागेल.
30 दिवसानंतर अर्ज केल्यास बॅंका अर्ज स्वीकारण्यास बांधील नसतात. याशिवाय व्यवहाराची स्लिप किंवा अकाउंट स्टेटमेंट व एटीएम कार्डचा तपशील पुरावा म्हणून बँकेला द्यावा लागतो.
नुकसान भरपाईसाठी, अर्ज फॉर्म (परिशिष्ट 5 फॉर्म) भरावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, आपल्याला बँकेकडून दररोज 100 रुपये भरपाई दिली जाईल .
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved