अहमदनगर :- भारत – पाक सिमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे.
कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती.

लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती.
जवान वाल्टे त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत.
वाल्टे यांचे प्राथमिक शिक्षण दहीगावमध्ये झाले होते. त्यानंतर कोपरगावमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले.
मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.
- दत्तक मुलाला दत्तक पालकांची जात लावण्याचा पूर्ण हक्क; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- अर्थसंकल्प २०२६ मध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा? पीएम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता
- नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाला गती; नाशिकच्या दळणवळण विकासाला नवे वळण
- सोयाबीनच्या भावात जोरदार तेजी; ६ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता
- मुंबईकरांना दिलासा! २०२६ मध्ये पाच मोठे पूल व उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होणार













