आता तर हद्दच झाली! काय म्हणावे या चोरांना…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-आतापर्यंत शेतकरी अनेक आस्मानी संकटे झेलत असताना अजूनही त्याच्या संकटात भर पडली आहे ती भुरट्या चोरांची.

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत परिसरातील अधोरेवाडी शिवारातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील तब्बल ५ क्विंटल लिंबं चोरून नेले आहेत .

याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत परिसरातील अधोरेवाडी शिवारात अशोक अधोरे यांची व अशोक येडे यांची शेतजमीन असून, दोन्ही ठिकाणी लिंबोणीच्या फळबागा आहेत.

दि.२०फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतातील लिंबोनीच्या फळबागेतुन तब्बल ५ क्विंटल लिंब चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News