अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसने दुपटीहून अधिक जागा पटकावत जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध केले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी यंदाच्या नगर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते.
मागील निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या श्रीगोंद्याच्या बबनराव पाचपुतेंना पराभूत करून पवारांनी जसा करिष्मा दाखवला होता, तसाच या वेळी अकोल्यात पिचडांना पराभूत करून दाखवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पवारांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे सिद्ध होते.

राष्ट्रवादी पक्षाला आलेली उभारी कायम ठेवून पुन्हा संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न आता सुरू होतील. पूर्वी पक्षात आपसांत कुरबुरी होत होत्या. बहुतांश नेते केवळ पक्षाध्यक्ष शरद पवार आल्यानंतरच एकत्र येत असत.
त्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समर्थक सुप्त गटही अस्तित्वात होता. आता मात्र रोहित यांचा संपर्क वाढणार आहे. त्यांचे नेतृत्व जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनाही मान्य करावे लागणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जे आमदार निवडून आले, त्यातील चौघे युवा आहेत. उरलेलेही तसेच तरुणच आहेत. एकाच वयोगटातील असल्याने रोहित यांच्यासोबत त्यांचे सूर अधिक चांगल्या पद्धतीने जुळून संघटना बांधणीसाठीही त्याचा फायदा होईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते मानतात.
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना
- नेवासा तालुक्याती मंदिरातील टाळ चोरीचा गुन्हा पोलिसांनी २४ तासातच आणला उघडकीस, आरोपींना अटक
- शेतकऱ्यांनो! वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरा अन्यथा भविष्यात शेती धोक्यात येऊ शकते