अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची.

केडगाव हत्याकांडात जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता. शेवटपर्यंत साथ देणाऱ्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.
- सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किती कमी झालेत दर ? वाचा……
- भारतातील सर्वात उंच स्थानक 2027 मध्ये सेवेत ! ‘या’ शहरात विकसित करणार 16 मजली उंच रेल्वे स्टेशन ! लंडन, पॅरिसला देणार टक्कर
- महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !
- सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी बनलाय डोकेदुखी ! शेतजमीन खरेदी-विक्रीचा नियम पूर्णपणे बदलला, ‘या’ कागदाविना आता जमीन विक्री होणे अशक्य
- नोकरीसाठी आता बेंगलोरला जाण्याची गरजच नाही….! पुण्यानंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारले जाणार आयटी पार्क













