अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची.

केडगाव हत्याकांडात जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता. शेवटपर्यंत साथ देणाऱ्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.
- ई-केवायसीतील चुका ठरल्या अडथळा; नाशिक जिल्ह्यातील १.७३ लाख ‘लाडक्या बहिणी’चा जानेवारी हप्ता होल्डवर
- शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी नवीन कृषी कायदे; बनावट बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा
- १ फेब्रुवारी २०२६ पासून आर्थिक बदल; घरगुती बजेटवर होणार थेट परिणाम
- आठव्या वेतन आयोगावरून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा; 12 फेब्रुवारीला देशव्यापी एकदिवसीय संपाची शक्यता
- Volkswagen India ची 2026 साठी मोठी तयारी; 5 नवीन कार्स लाँच होणार, Tayron R-Line ठरणार सर्वात खास SUV













