राहाता :- तालुक्यातील गोगलगांव येथील तरुण शेतक-याने सततची नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. रवींद्र लक्ष्मण मगर (वय ३०) असे या शेतक-याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता.
रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे पदरी पडले नाही. यामुळे रवींद्र हा वैफल्यग्रस्त होता.

त्यातच दिवाळी सणाकरीता कुटूंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने तो ताणतणावात होता. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृध्द आई घरात झोपल्यानंतर रवींद्र्रने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.
- श्रीरामपूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?, कोणत्या राज्यात किती जिल्हे?, पाहा आकडेवारी
- पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा डीपीआर पूर्ण ! संगमनेरमार्गे की शिर्डीमार्गे कशी जाणार नवीन रेल्वे लाईन?
- जगातील काही देशांपेक्षाही मोठं आहे भारतातील ‘हे’ शहर! एका टोकापासून दुसऱ्या टोकावर जायला लागतो तासांहून अधिक वेळ
- Post Office च्या आरडी योजनेत 10,000 रुपयाची गुंतवणूक केल्यास 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार?