राहुरी : नगर-मनमाड राज्यमार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या मार्गावरून प्रवास करणे अवघड झाले आहे. प्रशासन खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास तयार नसल्याने राहुरी फॅक्टरी येथील तरुणांनी एकत्रित येऊन ‘खड्ड्यांचे मोजमाप करा व बक्षीस मिळवा’ हे आंदोलन सुरू केले आहे.
नगर-मनमाड राज्यमार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होऊन अनेक जण जखमी अन् मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. शासनाचे डोळे उघडावे यासाठी राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन दि. २६ ऑक्टोबर रोजी दिवाळी सणाचा कालावधी असतानाही खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.

परंतु, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची तसदी शासनाने घेतली नाही. त्यामुळे राहुरी फॅक्टरी येथील युवकांनी ‘लढा नगर-मनमाड रस्त्यासाठी’ हा व्हॉट्स ॲप ग्रुप बनवून जिल्ह्यातील अनेक तरुणांना यात समाविष्ट करून नागरिकांसाठी खड्ड्यांचे मोजमाप करा व बक्षीस मिळवा ही योजना सुरू केली आहे.
यासाठी १ हजार, ७००, ५०० रुपये अशी बक्षिसे ठेऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे छायाचित्र अथवा लांबी-रुंदीत मोजमाप करून ठिकाण आदी माहितीसह व्हॉट्स ॲप क्रमांकावर दि. ५ नोव्हेंबरपर्यंत मागितले असून, स्पर्धेचे बक्षीस वितरण ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्रात सापडली सापाची नवीन जात ! ‘हा’ नवा खतरनाक साप कोब्रापेक्षा अधिक विषारी, संशोधकांची मोठी माहिती
- South Indian Bank Jobs: साउथ इंडियन बँकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज कसा करायचा जाणून घ्या संपूर्ण माहिती….
- संगमनेर मध्ये आमदार अमोल खताळ करतायेत तरी काय ? एक रुपया निधी न आणता उद्घाटन….
- सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय ! सातव्या वेतन आयोगातील ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवण्याचे आदेश
- राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय