श्रीरामपुर: तालुक्यातील कमालपूर येथे दीपावली पाडव्याच्या दिवशी सायंकाळी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी ग्रामस्थ व युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवकांना बहुमोल मार्गदर्शन केले. तर पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धिर दिला.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आलेल्या दिवाळी सणावर अवकाळी पावसाचे सावट होते. शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने कमालपूर मधील शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. सोयबीन, कापूस, बाजरी, मका यांसह अनेक पिके हातातोंडाशी आलेली असतानाच अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.

या व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी गावातील युवक तसेच शेतकरी वर्गाशी संवाद साधला. नोकरी व व्यावसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असणारे अनेकजण दिवाळीनिमीत्त गावी आलेले होते. त्यांच्याशीही विविध विषयांवर मुरकुटे यांनी चर्चा केली.
- भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांचा राहुरीत जनता दरबार, नागरिकांच्या समस्यांचा केला निपटारा
- अहिल्यानगरमधील तरूणांचा गाजियाबाद येथे झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचा नातेवाईकांचा आरोप
- राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारा अन् पुल दुरूस्तीचे काम ललकरच लागणार मार्गी, काम जलसंपदा विभागकडे वर्ग
- मृत्यू म्हणजे जणू आनंदाचा उत्सव, लोक रंगीबेरंगी कपडे घालून पार्टी करतात! कोणत्या देशात पाळली जाते ही विचित्र परंपरा?
- 67 ट्रॅक आणि 44 प्लॅटफॉर्म…’हे’ आहे जगातील सर्वात रहस्यमय आणि मोठे रेल्वे स्टेशन! गिनीज रेकॉर्डमध्येही झालीय नोंद