मुंबई :- धमक असेल तर भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचं ते बघू. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आज 145 पेक्षा जास्त आमदारांची यादी आहे असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.
राऊत यांच्या या दाव्यामुळे भाजपचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही जास्तिचं काहीही मागत नाही. जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत असल्याचंही ते म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री जर म्हणत असतील की भाजपचं सरकार येणार आहे तर त्यांनी राज्यपालांकडे दावा करावा आणि राज्यपालांनी त्यांना आठ, पंधरा नाहीतर एक महिन्यांची मुदत बहुमत सिद्ध करण्यासाठी द्यावी. ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर इतर सर्व पर्याय खुले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली म्हणून चर्चा थांबली. आता चर्चा मुख्यमंत्रिपदावरच होईल. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निकालानंतर महाराष्ट्राकडे लक्ष दिलं नाही.
चर्चेबाबत शहांनी पुढाकार घेतला नाही. कारण त्यांनी ही जबाबदारी राज्यातील नेतृत्वाकडे दिली आहे. हरियाणाचा तिढा सुटला, मग महाराष्ट्राचा का सुटला नाही?’ असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं.
- 1 लाख डाउन पेमेंटवर मारुती स्विफ्ट घ्या; 5 आणि 7 वर्षांच्या EMI पर्यायांची सविस्तर माहिती
- Vivo X200T भारतात लॉन्च; 150MP कॅमेरा, 6200mAh बॅटरी आणि दमदार ऑफर्ससह प्रीमियम स्मार्टफोन
- भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू; बारामती विमानतळावर दुर्घटना, राज्यात शोककळा
- भुसावळ-इगतपुरी मेमू सेवेचा थेट कसारापर्यंत विस्तार; उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची जोरदार मागणी
- मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांवर सरकारची मोठी कारवाई; थेट आदेशाने खळबळ, पुढे काय?













