अहमदनगर: निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. शेतीवर सतत येणाऱ्या संकटांमुळे सर्वसामान्य शेतकरी पुरता हतबला झाला आहे.
यावर्षी पाथर्डी तालुक्यातील चितळी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे आदी गावांना परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. सततच्या पावासामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाण्यामुळे पिके सडू लागली आहेत. मागीलवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळा होता.

तर यावर्षी ओल्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. सततच्या पावसाने परिसरातील बाजरी, कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
- NSDL Share: NSDL चा शेअर खरेदी करावा का? काय म्हणतात तज्ञ? दिली पुढील टार्गेट प्राईस
- Multibagger Stock: 5 वर्षात ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना दिला 8957.80% चा परतावा! आता BUY करावा का?
- Penny Stock: काही पेनी स्टॉकने दिले 500% पर्यंत रिटर्न! पेनी स्टॉकमधील गुंतवणूक फायद्याची राहील का? काय म्हणतात तज्ञ?
- IPO 2025: लवकरच येत आहे 2025 मधील सर्वात मोठा IPO?… गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार! आली फायद्याची अपडेट
- Financial Planning: तुमचे वय वर्ष 40 आहे? तर असे करा आर्थिक प्लॅनिंग… हातात राहील पैसा