पारनेर :- कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून साबळेवाडी येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाळू सुखदेव चाटे (वय ५०) यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी दुष्काळात त्यांचे उसाचे पीक जळाले.
यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिके वाया गेल्याने बँकांचे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यांनी २ ऑक्टोबरला विषप्राशन केले. त्यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

पाणी उपलब्ध असूनही शेतीमालाला भाव नाही, म्हणून आत्महत्या करण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे.
- आनंदाची बातमी ! शिर्डी मधील ‘या’ रस्त्यासाठी 230 कोटी रुपयांचा निधी मंजूर, कोणत्या गावांना होणार फायदा? वाचा….
- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि सण अग्रीम वाढला
- १ मेपासून बँकिंग, रेल्वे आणि गॅसच्या दरात होणार मोठे बदल, या नवीन नियमाबाबत जाणून घ्या सविस्तर!
- अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करायचीय? तर ही वेळ आहे सोनेखरेदीसाठी अत्यंत शुभ, जाणून घ्या सविस्तर!
- अहिल्यानगरमधील सिमेंट कारखान्याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध, सुनावणी सुरू असतांना शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर