मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.

यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.
राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले असतानाही राज्यात नव सरकार स्थापन झालेलं नाहीये.
निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने ५६ जागां जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडे गेल्या आहेत.
- भारताच्या ‘या’ 5 शस्त्रांनी चीन-पाकिस्तानला फोडला घाम; HELINA, ASTRA, LCA आणि…पाहा भारताची भक्कम शस्त्रप्रणाली!
- 9 तासांचा प्रवास होणार फक्त साडे तीन तासांत; भारतात बनतोय आशियातील सर्वात लांब बोगदा!
- तुमचं कपाळ बदलू शकतं तुमचं भाग्य, जाणून घ्या कपाळाच्या रचनेवरून काय काय समजतं!
- ट्रकचालक टायरशेजारी का लावतात रबर ट्यूब?, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
- ‘या’ शेअरने बाजारात पाऊल ठेवताच दिला जबरदस्त फायदा, गुंतवणूकदारांमध्ये उत्साह… गुंतवणुकीसाठी उत्तम संधी