मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.
यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.
राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले असतानाही राज्यात नव सरकार स्थापन झालेलं नाहीये.
निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने ५६ जागां जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडे गेल्या आहेत.
- मानवतेची सेवा करणाऱ्या लंके यांना संसदेत पाठवा शरद पवार यांचे आवाहन श्रीगोंदे येथे पवार यांची जाहिर सभा संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती
- भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांचा पारनेरात उद्रेक बाजार समितीतील लिलाव बंद पाडले पारनेर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन
- SUV खरेदी करणाऱ्यांना बसणार मोठा फटका ; महाग झाली ‘ही’ लोकप्रिय एसयुव्ही कार !
- डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही !
- गुड न्यूज ! भारतीय बाजारात लॉन्च झाली 170 किलोमीटरची रेंज असणारी ‘ही’ नवीन Electric Scooter ; किंमतही खिशाला परवडणारी, पहा…