नगर : नगररचना विभागात महापालिकेने महिनाभरापूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना अखेर कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. महिनाभर हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी केवळ बसून होते. आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेतल्यानंतर कामकाज वाटपास वेग आला. यामुळे येथील कामाला वेग येण्याची शक्यता आहे.
नगररचना विभागात गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचारी तळ ठोकून बसले होते. काही कर्मचारी तीस तर काही वीस वर्षांपासून एकाच विभागात एकाच टेबलवर काम पाहत होते. त्यातील काहींच्या बदल्या करण्याचा प्रयत्न मध्यंतरी करण्यात आला.

file photo
मात्र त्यांनी बदलीनंतर रजा टाकून प्रशासनावर दबाव आणत पुन्हा नगररचना विभागात तोच टेबल मिळविला. पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी यांच्या हातमिळवणीने नगररचनातील मक्तेदारी संपुष्टात आणणे कठीण झाले होते.
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही