मुंबई: पुढचं सरकार भाजपचंच असेल, असा विश्वास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, असंही ते म्हणाले.
अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं कधीही ठरलं नव्हतं, तसंच एकदा या फॉर्म्युलामुळे बोलणी फिस्कटली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझे फोन उचचले नाहीत,असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरही टीका केली. मागच्या काही दिवसांमध्ये आणि मागच्या 5 वर्षांमध्ये शिवसेना नेत्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहूनही सर्वोच्च नेत्यावर टीका करणं चुकीचं आहे.
अशाप्रकारची टीका विरोधकांनीही केली नसल्याचं फडणवीस म्हणाले. तुमच्या टीकेला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, पण आम्ही तशी टीका करणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
- मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण ! मुंबईतील ‘या’ भागात लॉटरीविना म्हाडाचे घर मिळवण्याची सुवर्णसंधी
- आचारसंहितेच्या काळातही लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळणार का ? महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट
- पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! एकूण तीन टप्प्यात पूर्ण होणार प्रकल्प, कसा आहे संपूर्ण रूट?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू होणार का ? समोर आली मोठी अपडेट
- ब्रेकिंग : बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, आरबीआयची महाराष्ट्रातील ‘या’ तीन बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण