कोपरगाव : शहरातील संजयनगर भागात एका तरुणावर पाच तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यात सदर तरुणाला गंभीर दुखापत झाली असून पाचजणांविरूद्ध कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी शहरातील संजयनगर भागातील सोमनाथ संपत रोठे (वय २१) हा तरूण दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बकऱ्या आणण्यासाठी आरोपींच्या घराकडे गेला होता.

तो त्याच्या बकऱ्या घराकडून घेऊन परत येत असताना संजू गायकवाड, राहुल सोमनाथ गायकवाड, सोमनाथ गायकवाड, आकाश गायकवाड, किरण गायकवाड (सर्व रा. संजयनगर, ता.कोपरगाव) यांनी विनाकारण त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच संजू गायकवाड याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात चॉपर खुपसून गंभीर जखमी केले.
- घरातील सर्वानी एकाच साबणाने अंघोळ करावी का ? केली तर काय होते ?
- Depression Tips : डिप्रेशनमुळे जाऊ शकतो जीव ! डिप्रेशनला हरविण्यासाठी ३ महत्वाचे उपाय
- सर्पदंशामुळे माणसाचा सुद्धा मृत्यू होतो, पण साप मुंगसाला का घाबरतो ? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण ?
- Snake Facts : सापाचं आयुष्य किती असतं ? साप दिसल्यावर काय करावं ? वाचा कधीही न वाचलेली महत्वाची माहिती
- Popcorn Nutrition Facts : पॉपकॉर्न खाल्याने काय होते ? जाणून घ्या पॉपकॉर्न खाण्याचे फायदे