मुंबई : विधानसभा निवडणुका होताच नाशकात सिलिंडरचे दर तीन महिन्यांत तब्बल ११३ रुपयांनी वाढले आहेत. ऑगस्ट महिन्यात सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची घट होऊन, दर ५६७ रुपये ५० पैसे होते.
त्यानंतर निवडणुका होताच सिलिंडरचे दर हळूहळू वाढत दि. १० नोव्हेंबरअखेर तब्बल ६८० रुपयांवर गेले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या वेळी विनाअनुदानित सिलिंडरच्या (१४.२ किलो) भावात ७७ रुपयांनी वाढ झाली असून, याचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे.

राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. अजून नवे सरकार स्थापन झालेले नाही; मात्र राज्यात केंद्र सरकारने सिलिंडर दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्याला सिलिंडरची दरवाढ होत आहे.
तीन महिन्यांत १४.२ किलोचे घरगुती सिलिंडरचे दर ११३ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्ये १५.५० रुपये, तर ऑक्टोबरमध्ये १३ रुपयांनी दर वाढलेत.
- मुंबई-पुणेकरांसाठी एकदिवसीय सहलीचे उत्तम पर्याय; विकेंडला ‘शांतता’ देणारी महाराष्ट्रातील ५ पर्यटनस्थळे
- मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा: मुंबई-नवी मुंबई विमानतळांना जोडणारी मेट्रो-8; 35 किमी मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी
- दहावीनंतर सायन्सचा मोठा निर्णय : पीसीएम, पीसीबी की पीसीएमबी? करिअर ठरवणारी योग्य निवड कशी करावी
- बाबा वेंगांची भविष्यवाणी ठरली खरी? सोन्याच्या दरांनी मोडले सर्व विक्रम, सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोने
- संघर्षातून संत्रा बागेपर्यंतचा प्रवास; अमरावतीच्या भारती पोहोरकर ठरल्या महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान













