मुंबई :- गेल्या अठरा दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेला अखेर आज सांयकाळी पूर्णविराम भेटला आहे. राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला असून राष्ट्रवादी व काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देण्यात आले आहे. फॅक्सव्दारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे २० वर्षानंतर महाराष्ट्रात आता शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे.
शिवसेनेतून मुख्यमंत्रिपदासाठी काही नावं पुढे येतायत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. तर उप मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.अजित पवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवून राज्यात पर्यायी सरकार दिले आहे. उद्या मंगळवारी शपथविधी सुद्धा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवून राज्यात पर्यायी सरकार दिले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.
- Safest Cars : सुरक्षित कार खरेदी करायचीय?, मग बघा भारतातले स्वस्त 5-स्टार सुरक्षा रेटिंग असलेले बेस्ट पर्याय, फीचर्सही भन्नाट!
- Ahmednagar News : दहा रुपयांची फाटकी नोट घेतली नाही म्हणून दुकानच पेटवून दिले, अहमदनगरमधील घटना
- Ahmednagar Breaking : सारडा कॉलेज वस्तीगृहाच्या ‘त्या’ जागेची विक्री, हस्तांतरण, भाडेपट्टा देण्यास धर्मादाय उपायुक्तांचा ‘मनाई हुकूम’ जारी
- FD Interest Rates : SBI पेक्षाही ‘या’ बँका FD वर देत आहेत सर्वाधिक व्याज, आजच गुंतवा पैसे
- टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा ! मोठे बदल