अहमदनगर : ”शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडी करून सत्तास्थापन करत आहेत. मात्र युतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा फॉर्म्युला ठरवून दिला आहे. तो शिवसेनेने आठवायला पाहिजे.
त्यानुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे युती असताना दिलेला हा फॉर्म्युला आहे. तो शिवसेनेने जपला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय विखे पाटील नगर शहरात तीन दिवस दौर्यावर आहेत.

खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, ”राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना मित्रपक्षांच्या महायुतीला कौल दिला आहे. या जनादेशाचा आदर शिवसेनेने केला पाहिजे. भाजपने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला चांगला प्रतिसाद दिला होता. परंतु काही अडथळे आले.
शिवसेनेने सत्तेचे बदलल्या समीकरणामुळे जनतेच्या विश्वासला तडा जात आहे”. शिवसेना मागत असलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं का, यावर खा. विखे पाटील म्हणाले, ”हे मला माहित नाही. ज्यावेळी ठरत होतं. ते बंद खोलीत ठरत होतं.
आम्ही खोलीबाहेर बसत होतो. त्यामुळे ते आपल्याला माहित नाही. परंतु जनतेने महायुतीला कौल दिला आहे. हे मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे”.राज्यात कोणाचीही सत्ता येवो. कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री होवो.
परंतु मुख्यमंत्र्यांनी आल्याबरोबर शेतकर्यांच्या बाजूने निर्णय घेतला पाहिजे. अतिपावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपये मदत मिळाली पाहिजे. यासाठी मी सत्ताधारी पक्षात असलो, तरी शेतकर्यांसाठी लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन आंदोलन करेल, असा इशारा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिला.
- सलमान खान-संजय दत्तमुळे बनलं एका फ्लॉप अभिनेत्याचं करिअर, 2004 चा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट तुम्ही पाहिलाय का? वाचा पडद्यामागील कहाणी
- महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-6 खेळाडूंची यादी, नंबर-1 वर भारताची झुलन गोस्वामी!
- फक्त ₹200 मध्ये कॉलिंग, डेटा, OTT अॅक्सेस आणि बरंच काही; Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट बजेट फ्रेंडली प्लॅन!
- ‘या’ 10 सवयी आत्ताच बदला, अन्यथा तुमचा फ्रीजच बनू शकतो टाइम बॉम्ब! एका झटक्यात घर जळून खाक होईल
- नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? ‘या’ सरकारी स्कीम्स देतील 10 लाखांपासून 10 कोटींपर्यंत लोन; जाणून घ्या संपूर्ण माहिती!