मुंबई :- सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याचं समजतं आहे.
मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यास राष्ट्रवादी असमर्थ असल्याचा निष्कर्ष काढत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यावर अखेर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.

आज सकाळपासूनच आजच राष्ट्रपती लागू होईल अशी चर्चा सुरु होती. राज्यपाल आज रात्री 8.30 पर्यंत वाट पाहतील. जर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यास राष्ट्रपती राजवटीची शिफारस होऊ शकते, असं म्हटलं जात होतं.
परंतु राज्यपालांनी दुपारी दीडच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्यांचं पत्रे आहेत की नाही याबाबत विचारणा केली. मात्र आमच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचं राष्ट्रवादीने राज्यपालांना कळवलं.
त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीसंदर्भातील अहवाल राष्ट्रपतींना पाठवलं. आणि त्यानंतर आता राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
काँग्रेसला आमंत्रण न देणं हा निर्णय पक्षपातीपणाचं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. एकट्या राष्ट्रवादीला आमंत्रण देणं चुकीचं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून आमंत्रण द्यायला हवं होतं. काँग्रेसला आमंत्रण न देणं हा निर्णय पक्षपातीपणाचं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले टॉप 5 शेअर्स, गुंतवणूकदार बनतील श्रीमंत
- सप्टेंबरमध्ये लाँच झालेला iPhone 17 मिळतोय फक्त 35,900 रुपयांना, ‘या’ स्टोअर्सवर सुरु आहे स्पेशल ऑफर
- 30 वर्षांचा प्रश्न एका झटक्यात सुटला…..! महाराष्ट्राला मिळाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, रेल्वे मंत्रालयाने दाखवला हिरवा कंदील, कसा असणार रूट?
- 2026 बोर्ड परीक्षेपासून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे बक्षीस ! महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेने सुरू केला अभिनव उपक्रम
- महाराष्ट्रात 42,000,00,00,000 रुपयांचा नवीन महामार्ग तयार होणार ! ‘हे’ जिल्हे ठरणार लकी, 699 किलोमीटर लांबी, 3 वर्षात पूर्ण होणार काम, पहा संपूर्ण रूट…..