उत्तर प्रदेश :- हरदोईच्या सरकारी रुग्णालयातील परिचारिकेने ६-६ बोटे असलेल्या नवजात अर्भकाचे एक-एक बोट कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मृत बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून परिचारिकेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरदोईतील बाढ करेंखा गावातील लक्ष्मी नामक महिलेला शनिवारी रात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तिला तातडीने बिलग्राममधील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी)मध्ये दाखल करण्यात आले.
रविवारी सकाळी लक्ष्मीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या हाताला पाचऐवजी सहा-सहा बोटे होती; परंतु रुग्णालयातील परिचारिका विद्यादेवीने बाळाचे एक-एक बोट कापून टाकल्याचा आरोप लक्ष्मीचे पती रवींद्र यांनी लावला. बोट कापल्याने बाळाची प्रकृती खालावली; परंतु रुग्णालयाने त्याकडे कानाडोळा करत आई व बाळाला रुग्णालयातून सुट्टी दिली.
- भारत हादरला ! माजी पंतप्रधानांच्या नातवाचे सेक्स स्कॅंडल, शेकडो महिलांवर अत्याचार.. नातू जर्मनीला पळाला
- मंत्री छगन भुजबळ सांगा कुणाचे? महायुतीचे की मोठ्या पवार साहेबांचे ! ऐन लोकसभेच्या तोंडावर पडद्यामागे नेमके काय ?
- अभिनेता साहिल खानला अटक, चाळीस तास पाठलाग ! 1 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, काय आहे प्रकरण? पहा..
- पंजाबरावांचा मे महिन्याचा हवामान अंदाज आला, कसं राहणार पहिल्या आठवड्याचे हवामान ? अवकाळी पाऊस बरसणार का ?
- Ahmednagar Politics : ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा..! अहमदनगरमध्ये लागले बॅनर्स, त्यावरील आकृती व संदेशाने राजकीय गणिते बदलणार ? पहा..