उत्तर प्रदेश :- हरदोईच्या सरकारी रुग्णालयातील परिचारिकेने ६-६ बोटे असलेल्या नवजात अर्भकाचे एक-एक बोट कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मृत बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून परिचारिकेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरदोईतील बाढ करेंखा गावातील लक्ष्मी नामक महिलेला शनिवारी रात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तिला तातडीने बिलग्राममधील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी)मध्ये दाखल करण्यात आले.

रविवारी सकाळी लक्ष्मीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या हाताला पाचऐवजी सहा-सहा बोटे होती; परंतु रुग्णालयातील परिचारिका विद्यादेवीने बाळाचे एक-एक बोट कापून टाकल्याचा आरोप लक्ष्मीचे पती रवींद्र यांनी लावला. बोट कापल्याने बाळाची प्रकृती खालावली; परंतु रुग्णालयाने त्याकडे कानाडोळा करत आई व बाळाला रुग्णालयातून सुट्टी दिली.
- बँक ऑफ बडोदाची 3 वर्षांची एफडी योजना बनवणार मालामाल ! 100000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार ‘इतके’ रिटर्न
- महाराष्ट्राला मिळणार 100 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग ! केंद्राच्या मंजुरीनंतर रेल्वे प्रशासनाने सुरू केले काम, कसा असणार रूट?
- Hyundai चा नादखुळा ! 6 लाखाच्या कारवर 60 हजार रुपयांचा डिस्काउंट, सप्टेंबरसाठी कंपनीची खास ऑफर
- जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर ‘या’ 4 कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल !
- ‘या’ बँकेच्या शेअर्समध्ये 19.5% ची घसरण होणार ! ब्रोकरेज म्हणतात शेअर्स विकून टाका, नाहीतर….