अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या ढिसाळ नियोजनामुळे व दुर्लक्षामुळे गेल्या दीड वर्षात कुकडी आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे यांनी केला.
कर्जतसह दोन तालुक्यातील सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त असणाऱ्या क्षेत्राला हक्काचे पाणी न मिळाल्याने शेतकरी देशोधडीला लागून
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/02/Rohit-Pawar.jpg)
file photo
आर्थिक संकटात सापडून आत्महत्येची भाषा करीत असून माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी यांच्या काळात योग्य नियोजन करून नियमित कुकडीचे आवर्तन मिळवून दिले होते.
परंतु आता शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागा व पिके जळत असताना तालुक्यातील अर्थव्यवस्था कोलमडून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम