अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारले जाईल.
एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2019/10/871651-ajit-pawar-1-2.jpg)
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला असल्याची भावना बळीराजाने व्यक्त करून दाखवली.महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांना सदर पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
यातून शेती उत्पादनात वाढ होईल.तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या या योजनेअंतर्गत निर्धारित वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३% व्याज सवलत १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत १% टक्का व्याज दरात सवलत दिली जात होती.
आता १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये करावी. त्यांना अधिक २% व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
त्यामुळे आता सन २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत्तीच्या कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण ६% व्याज सवलत मिळून अंतिमत: त्यांना सदरचे पीक कर्ज ०% (शून्य) टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम