नागरिकांवर झडप घालणारा ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरासह पठारभागात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे .

अन्नाच्या शोधात भटकंती करत असताना वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात तो अलगद अडकला. या बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून साकुर परिसरातील शेतकऱ्यांचे वासरे, शेळ्या, अनेक कुत्री फस्त केली होती.

यामुळे शेतात राहणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत होते. चिंचेवाडी शिवारात गेल्या दोन दिवसांपुर्वीच या बिबट्याने रूपाली सचिन खेमनर , संजय महादू कुदनर, पप्पु भागा थोरात यांच्यावर हल्ला केला होता.

तर कोकरे यांच्या तब्बल ५ मेंढ्यांचा फडशा पाडला होता. बिबट्याच्या दहशतीने परिसरातील नागरीक भयभयीत झाल्याने नागरिकांनी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती. हा पिंजरा लावला व मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe