नगर शहरातील बाजारपेठा खुल्या करा; संग्राम जगताप यांची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात केंद्र व राज्य सरकारने लाॅकडाऊनचा वापर करुन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मदत झाली.

मात्र, व्यापारीकरण आर्थिक संकटात सापडले आहे. व्यापाऱ्यांना धीर देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तरी मुंबई-पुणे येथे रविवारी सरकारने घोषणा करून बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे नगर शहरातील बाजारपेठ खुल्या कराव्यात, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.

जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिक कारणासाठी 7 ते 4 ही वेळ दिली आहे. तरी आता ११ ते ६ वेळेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून व्यवसायिकरणाला चालना मिळेल. शहरातील उद्योजकांकडे हजारो कामगारचे कुटुंब अवलंबून आहे. त्‍ यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तरी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आमदार संग्राम जगताप व व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा व शनिवार, रविवार सुद्धा दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी केली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना आमदार संग्राम जगताप व शहरातील व्यापारी संघटनांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी व्यापारी सुभाष कायगावकर, माजी नगरसेवक संजय चोपडा, संतोष बोरा, सचिन मुथा, उमेश बोरा, प्रेमराज पोखरणा, रवी गुजराती, राजेंद्र बोथरा, नाना बोजा आदी उपस्थित होते.

यावेळी व्यापारी संतोष बोरा म्हणाले की, कोरोनाच्या महासंकट काळामळे व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. नगर शहरातील बाजारपेठावर हजारो कुटुंबंचे उदरनिर्वाह अवलंबून आहे.

वारंवार लाॅकडाऊनमुळे बाजारपेठा उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. नगर शहरातील व जिल्ह्यातील ग्राहक या बंदमुळे इतर जिल्ह्यांमध्ये खरेदीसाठी जाऊ लागला आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe