अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात व्याजवाडी गावात राहणाऱ्या नितीन गोळे या आरोपीने 2019 मध्ये एक आणि आता 3 ऑगस्टला एक असे दोन खून केल्याचं समोर आलं आहे .
पत्नी आणि प्रेयसी या दोघींचे खून इतर पुरुषांशी असलेल्या अनैतिक संबंधातून झाल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. सातारा जिल्हा एका दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे.

वाई तालुक्यातील व्याजवाडी परिसरात नितीन गोळे या आरोपीने आपली पत्नी आणि प्रेयसी अशा दोघींचाही खून केला आहे.
आरोपी नितीन गोळेने 3 ऑगस्टला प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करुन तिचा मृतदेह शेतात लपावला होता. पण भुईंज पोलिसांनी केलेल्या तपासात गोळेचं बिंग फुटलं.
विशेष म्हणजे आरोपी नितीन गोळे याने 2019 मध्ये पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरला होता 3 ऑगस्ट ला प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करून नितीन गोळे यानं तिचा मुतदेह शेतात लपावला.
या खूनाचा भुईंज पोलिसांनी छडा लावल्या नंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. 2019 मध्ये नितीन गोळेने पत्नी मनीषा गोळे हीचा देखील खून करून मृतदेह शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला असल्याचं समोर आलं.
धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा खून करते वेळी त्याची दोन लहान मुले तिथेच होती. आपल्या लहान मुलांच्या समोरच या नराधमाने पत्नीचा खून केल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.
नितीनने पत्नी मनीषा गोळेचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता, त्या ठिकाणी जाऊन खोदकाम करत पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला.नितीन गोळे साताऱ्यातील वाई तालुक्यातील व्याजवाडी गावात राहणारा आहे.
नितीन आर्मी मध्ये भरती झाला होता. पण अवघ्या दोन महिन्यातच तो तिथून पळून आला आणि सध्या शेती करत होता.सध्या तरी दोन खुनाची कबुली या आरोपीने दिली अजून काही खून केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम