देशात आतापर्यंत सव्वा चार लाखाहून अधिकांचा कोरोनाने घेतला बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- गेल्या दिवस वर्षांपासून देशात कोरोनाने कहर केला आहे. आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार १५ जण बरे झाले आहेत.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख ८५ हजार ३३६ आहे. सर्व कोरोना रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.२० टक्के आहे. देशातील दररोजचा संसर्गदर १.८८ टक्के आहे.

सलग वीस दिवस हा संसर्गदर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. दर आठवड्याचा संसर्गदर २ टक्के, तसेच कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३४ टक्के आहे.

आतापर्यंत ४ लाख ३१ हजार २२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ७३ लाख ५० हजार ५५३ कोरोना लसीचे डोस देण्यात आले.

आजवर ५८.३८ कोटी डोस नागरिकांना दिले आहेत. देशात चोवीस तासांत केरळमध्ये सर्वाधिक १९,४५१ नवे रुग्ण सापडले.

त्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये ५,७८७, तामिळनाडूमध्ये १,९१६, कर्नाटकमध्ये १,६३२, आंध्र प्रदेशमध्ये १,५३५ नवे रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपैकी ८४.०३ टक्के रुग्ण या पाच राज्यांत आहे. त्यातील ५३.९१ टक्के नवे रुग्ण एकट्या केरळमध्ये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe