श्रीगोंदे : श्रीगोंदे तालुक्यातील पिसोरे बुद्रुक येळपणे येथे गुरुवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बकुळाबाई तान्हाजी गिरे यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नगर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेडमध्ये अवकाळी पाऊस झाला.
अवकाळी पावसाने जनावरांच्या छावण्यांतील शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान, कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथे मेंढपाळ संभाजी शंकर पाटोळे याचा वीज पडून मृत्यू झाला.
श्रीगोंदे तालुक्याच्या पश्चिम भागातील येळपणे येथील पिसोरे बुद्रुकमधील बकुळाबाई तान्हाजी गिरे या शेळ्या चरण्यासाठी वीर मळ्यात गेल्या होत्या.
पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्यामुळे बकुळाबाई झाडाच्या आडोशाला थांबल्या. पण त्याच क्षणी त्याच झाडावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
- Samsung Galaxy : सॅमसंगने स्वस्त केला ‘हा’ 5G फोन, आता खर्च करावे लागणार फक्त ‘इतके’ रुपये…
- NPCIL Mumbai Bharti 2024 : मुंबईत NPCIL मध्ये 400 पदांची मोठी भरती; या तारखेपूर्वी करा अर्ज!
- Ahmednagar Politics : अजित पवारांचे दिग्गज नेते विखेंचे काम करत नसल्याचा रिपोर्ट गेला, दादांची नगरकडे धाव, थेट विखेंच्याच उपस्थितीत बैठक घेत झाडाझडती? नंतर…
- शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेपासून वादळी पावसाचे वातावरण निवळणार, आणखी किती दिवसं पाऊस ? माणिकराव खुळे यांची माहिती
- Ahmednagar Politics : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे अहमदनगरमधील ‘या’ नेत्यावर लक्ष ! विखेंवरील नाराजगी की आणखी काही प्लॅनिंग? पहा…