श्रीगोंदा : काँग्रेसने विखे कुटुंबाला मंत्रिपदे दिली, विरोधी पक्षनेतेपद दिले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. खासदारकीचे तिकीटही तुमच्या मुलालाच पाहिजे.
त्याचा बालहट्ट पुरवला नाही म्हणून तुम्ही काँग्रेसला धोका देऊन भाजपमध्ये गेला, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील मेळाव्यात केली.

लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस होते.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, आघाडीचे तिकीट मिळणार नाही याचा अंदाज आल्यावर विखेंनी भाजपत प्रवेश केला. जो आई-वडिलांचे ऐकत नाही, तो आपले काय ऐकणार. म्हणून उत्तरेचे पार्सल परत पाठवा.
या वेळी आमदार संग्राम जगताप, जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी भाषण केले. या वेळी करण ससाणे, ऋषिकेश भोईटे, अनुराधा नागवडे, मनोहर पोटे, ज्ञानदेव वाफारे, दादासाहेब मुंडे यांचीही भाषणे झाली.
आमदार राहुल जगताप, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, नगरसेवक सीमा गोरे, अर्चना गोरे, मधुकर शेलार, सुनील भोस या वेळी उपस्थित होते.
- आश्चर्यच!’या’ देशांमध्ये सूर्य मावळतच नाही, भारतात काळोख असताना इथे मध्यरात्रीही पडतो लख्ख प्रकाश
- जिल्ह्यात १ लाख ५ हजार टन खतांचा साठा उपलब्ध मात्र लिकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट
- प्रवाशांना वाटेत अडवून लुटणारा ‘बज्या’ गजाआड ; अनेक गुन्ह्यांची होणार उकल
- 1500 किलो वॉरहेड घेऊन धडकणारं क्षेपणास्त्र! आता भारताच्या रेंजमध्ये पाकसह चीनचं बीजिंगही, पाहा अग्नि-5 ची ताकद
- धाकट्यावारीत पंढरपूरच्या पूजेचा मान अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शिक्षक दाम्पत्याला