श्रीगोंदा : काँग्रेसने विखे कुटुंबाला मंत्रिपदे दिली, विरोधी पक्षनेतेपद दिले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. खासदारकीचे तिकीटही तुमच्या मुलालाच पाहिजे.
त्याचा बालहट्ट पुरवला नाही म्हणून तुम्ही काँग्रेसला धोका देऊन भाजपमध्ये गेला, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील मेळाव्यात केली.
लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस होते.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, आघाडीचे तिकीट मिळणार नाही याचा अंदाज आल्यावर विखेंनी भाजपत प्रवेश केला. जो आई-वडिलांचे ऐकत नाही, तो आपले काय ऐकणार. म्हणून उत्तरेचे पार्सल परत पाठवा.
या वेळी आमदार संग्राम जगताप, जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी भाषण केले. या वेळी करण ससाणे, ऋषिकेश भोईटे, अनुराधा नागवडे, मनोहर पोटे, ज्ञानदेव वाफारे, दादासाहेब मुंडे यांचीही भाषणे झाली.
आमदार राहुल जगताप, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, नगरसेवक सीमा गोरे, अर्चना गोरे, मधुकर शेलार, सुनील भोस या वेळी उपस्थित होते.
- Ahmednagar News : शेतकऱ्यांना खुशखबर ! कांद्याच्या भावात ७०० रुपयांनी उसळी, भाव वाढले
- उन्हाळ्याच्या सुट्ट्या शांत, थंडगार आणि निवांत वातावरणामध्ये एन्जॉय करायच्या तर ‘या’ हिल स्टेशनला द्या भेट! दडली आहेत महाभारतातील रहस्य
- युवा शेतकऱ्याने केले जगावेगळे धाडस! तब्बल 380 टँकर विकतचे पाणी घेऊन जगवले टरबूज, वाचा या शेतकऱ्याची धाडसाची कथा
- Ahmednagar News : शहरातील नागरिकांना मिळेना पाणी ! सुटतेय त्यात चार हांडेही भरेनात, सदोष वितरण, खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल
- Ahmednagar Politics : दाऊदच्या हस्तकांना विमानातून घेऊन आल्याचं जनता विसरलेली नाही ! जहरी टीका करत मंत्री राधाकृष्ण विखेंनी शरद पवारांचं सगळंच काढलं..