अहमदनगर: महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात क्षणाक्षणाला मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काल (गुरुवार) भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
पण आता निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे आता धनश्री विखे-पाटील यांना ही निवडणूक लढवता येणार नाही.

पण असं असलं तरी सुजय विखे-पाटलांचा भाजपकडून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राम राम ठोकत सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सुजय विखे यांनी अहमदनगरची उमेदवारी देखील जाहीर झाली होती. यासाठी १ एप्रिलला सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता.
पण काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सुजय विखेंचा पत्नी धनश्री विखे यांनीही भाजपकडून अर्ज भरला होता.
त्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली होती. पण आता निवडणूक आयोगाने सुजय विखे यांचा अर्ज वैध ठरवल्याने अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
- पुणे ते जळगाव प्रवास होणार फक्त 3 तासात ! तयार होणार नवीन एक्सप्रेस हायवे , कसा असणार रूट?
- घरापासून २० किलोमीटरच्या परिसरात टोलनाका असल्यास आता टोल द्यावा लागणार नाही, ‘हे’ डॉक्युमेंट दाखवावे लागणार
- सरकारी कर्मचाऱ्यांना २०२८ मध्ये लागू होणार नवीन आठवा वेतन आयोग ! कर्मचाऱ्यांना किती थकबाकी मिळणार?
- 2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?
- गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! शेअर मार्केट 15 दिवस बंद राहणार, NSE ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी













