पारनेर : राजकीय पक्ष आणि पार्ट्यांमुळे खेड्यांचा विकास थांबला आहे. पर्यायाने देशाच्या विकासाला खीळ बसली प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी हजारे बोलत होते.
या वेळी महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष कैलास पटारे, उपाध्यक्ष रोहिणी गाजरे, संघटक प्रवीण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे, राजाराम गाजरे व विविध जिल्ह्यांतील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

हजारे म्हणाले, गावातील एक गट चांगला काम करत असेल, तर दुसरा गट त्याला विरोध करतो. कारण पक्ष आणि पार्टीमुळे गावातील लोक दोन गटांत विभागले गेलेले आहेत.
गावातील लोकांनी घटनेच्या कलम ८४ ‘ख’ व ‘ग’ नुसार पक्ष-पार्टीविरहित निवडणूक लढवण्याचे आवाहन हजारे यांनी केले. असे झाले तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल.
- UPI Payment Rule: आता UPI च्या माध्यमातून 24 तासात करता येईल इतक्या पैशांचे ट्रांझेक्शन… जाणून घ्या नवीन लिमिट किती?
- Mahadbt Scheme: शेतकरी बंधूंनो! महाडीबीटीवरील कोणत्या योजनांसाठी कुठले लागतात कागदपत्रे? बघा लिस्ट
- पोस्ट ऑफिस बचत खाते उघडा आणि लाखोंचा नफा मिळवा! वाचा कोणते मिळतात फायदे?
- Multibagger Stock: 100 रुपयापेक्षा स्वस्त आहे ‘या’ कंपनीचा शेअर! 3 वर्षात दिला 532% चा रिटर्न…बघा फायद्याची अपडेट
- SIP Calculator: प्रतिमाह 5000 रुपयांची 15 वर्षे एसआयपीत गुंतवणूक केली तर किती पैसे मिळतील? समजून घ्या फायद्याचे गणित