संगमनेर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत असल्या,
तरी राज्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते वेगळे वागतील असे मला वाटत नाही, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी व्यक्त केली.

थोरात म्हणाले, विखे भाजपत जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांत सुरू आहे. तथापि, राज्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते वेगळं वागतील असं मला वाटत नाही.
सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये असलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांत मतभेद आणि मतमतांतरे असतात. मात्र, यावेळची निवडणूक विचारधारेची असल्याने आपसांतील मतभेद विसरले पाहिजेत.
भाजप सरकार घालवण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे थोरात म्हणाले.
- पैशांचा अक्षरश: पाऊस पडेल, वास्तुशास्त्रात सांगितलेले ‘हे’ उपाय एकदा करून तर बघा!
- जगातील सर्वात महाग मांस मिळतं ‘या’ देशात, किंमत ऐकून थक्क व्हाल! भारतातही वाढलीये याची जबरदस्त मागणी
- हिमाचल प्रदेश विनाशाच्या दारात?, 100 वर्षांत इतका धोकादायक बदल झाला की…, सत्य ऐकून थरकाप उडेल!
- 70% मुस्लिम समुदाय असूनही ‘या’ देशात हिजाब-बुरख्यावर बंदी, महिलांनी नियम तोडल्यास मिळते शिक्षा!
- DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकार किती पगार देते? आकडा ऐकून थक्क व्हाल!