अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे.
भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला.

तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी संवाद साधून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या. यावेळी ढाकणे बोलत होते.
यावेळी भीमराव फुंदे, बाळासाहेब ताठे, बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, किरण खेडकर, शिवशंकर राजळे, भाऊ तुपे, सुधीर पोटे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप यांनी २३ तारखेला मतदानाच्या माध्यमातून दादागिरी आणि पंतप्रधानांकडून तरुणांची होत असलेली थट्टा थांबण्यासाठी मोदींना व लोणीकरांना घरी पाठवा, असे आवाहन केले.
- तरूण पोरांची लग्न होत नसल्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर झाला मोठा परिणाम, शाळांमध्ये नव्या विद्यार्थ्यांची संख्या घटली
- पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4,000 रुपये गुंतवा आणि 60 महिन्यांनी 2,85,459 रुपये मिळवा, कस पहा संपूर्ण गणित
- गणेश भांड यांचा शिवसेना मध्ये प्रवेश ! विखे पाटलांचे समर्थक थेट शिंदे गटात…
- अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात वाढ; वांगे, कारले, दोडका आणि शेवग्याच्या शेंगा महागल्या
- डी मार्टपेक्षा स्वस्त सामान कुठं मिळत ? हे आहेत टॉप पाच पर्याय