पाथर्डी :- शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काहीच बोलत नाही.
फक्त कागदावरच कर्जमाफी, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख आदी फसव्या घोषणांची गाजरं दाखविण्याचे काम केले.

दोन कोटीऐवजी दोन युवकांना तरी या सरकारने नोकरी दिली का, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, असा खोचक सवाल आमदार संग्राम जगताप यांनी केला.
भातकुडगाव, शहरटाकळी, भावीनिमगाव, घोटण, गदेवाडी, मुंगी, हातगाव, कांबी आदि गावांत सभा व प्रचार फेऱ्या झाल्या. यावेळी ते बोलत होते.
ज्या भाजपसाठी आम्ही तन-मन-धनाने काम केले, त्या भाजपने शेवगाव तालुक्याचे वाटोळे केले. साडेचार वर्षांच्या सत्तेत तालुक्याचे लोकप्रतिनिधींचे कुठलेच ठोस विकासकाम नाही.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या आणि जनशक्ती मंचच्या नेत्या हर्षदा काकडे यांनी केले. काकडे यांनी जगताप यांच्या प्रचारात सहभाग घेतला.
- महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे मार्गासाठी आणखी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर !
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाची अखेरची डेडलाईन ! ‘या’ तारखेपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश
- Reliance Power Share Price: रिलायन्स पॉवर शेअर करणार धमाल! एका दिवसात 3.51% रिटर्न…आज मिळेल प्रॉफिट?
- HDFC Bank Share Price: एचडीएफसी बँकेचा शेअर BUY करण्याचा तज्ञांचा सल्ला! 1 वर्षात दिले 15.58% रिटर्न… आज स्थिती काय?
- SBI Share Price: SBI शेअरमध्ये मोठी उसळी! BUY करावा का? तज्ञ म्हणतात की?…