श्रीगोंदे :- भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत, ते विकासावर काय बोलणार?
सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवूनही ते भाजपमध्ये का गेले?

असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. विखे घराण्याला सर्व पक्षांची चाचपणी करण्याचा इतिहास आहे, असा टोलाही भुजबळ यांनी लावला.
चूक नसताना मला जेलमध्ये टाकले. मुख्यमंत्री म्हणतात, भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात.
मी आमदार, महापौर असताना आपण हाफचड्डीवर शाळेत जात होता. मग तुम्हाला विचारून भाषण करू का?
आ. जगताप यांनी श्रीगोंद्याच्या भूमिपुत्राला संधी देण्याचे आवाहन केले. राहुल जगताप म्हणाले, ‘भाजप सरकारने शेतकऱ्यांची सर्वात मोठी फसवणूक केली आहे.
शेतीमालाला हमीभाव देतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, असे त्यांनी जाहीर केले परंतु कर्जमाफी दिली नाही आणि हमीभावही दिला नाही. यामुळे देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
राजेंद्र नागवडे म्हणाले, मोदींनी १५ लाख देण्याची खोटी घोषणा केली.
देशाच्या सुरक्षेचे राजकारण भाजपने केले. अशा सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
घनश्याम शेलार म्हणाले, सुजय विखे दमबाजीची भाषा करतात. आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल.
- आश्चर्यच!’या’ देशांमध्ये सूर्य मावळतच नाही, भारतात काळोख असताना इथे मध्यरात्रीही पडतो लख्ख प्रकाश
- जिल्ह्यात १ लाख ५ हजार टन खतांचा साठा उपलब्ध मात्र लिकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट
- प्रवाशांना वाटेत अडवून लुटणारा ‘बज्या’ गजाआड ; अनेक गुन्ह्यांची होणार उकल
- 1500 किलो वॉरहेड घेऊन धडकणारं क्षेपणास्त्र! आता भारताच्या रेंजमध्ये पाकसह चीनचं बीजिंगही, पाहा अग्नि-5 ची ताकद
- धाकट्यावारीत पंढरपूरच्या पूजेचा मान अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शिक्षक दाम्पत्याला