अहमदनगर :- नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते.

ते म्हणाले, हिंदुस्थानचे राज्य चालवायचे असेल तर प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. ते समजावून घेतले पाहिजेत. मात्र प्रश्न समजावून घेणारी टीम पंतप्रधानांकडे नाही.
रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या सभेत सर्व रंगांचे कपडे घालणार्यांना प्रवेश असतो. मोदी साहेब हे फक्त शरद पवार यांच्यावरच बोलतात.
पवार हेच सर्व पक्षांना एकत्रित करू शकतात. म्हणून मोदी यांना शरद पवार यांची भीती वाटत असावी. कर्जमाफी दिली म्हणजे उपकार केल्यासारखे ते बोलत आहेत.
मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा कोणालाही लाभ झाला नाही.कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना सरसकट कर्जमाफी दिली गेली.
निवडणुकीच्या आधी काही दिवस सरकारने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. भाजपाचा कार्यकर्ता असेल तिथेच पालकमंत्र्यांनी छावण्या दिल्या, असा आरोप त्यांनी केला.
- सुखाचे दिवस संपलेत आता कोसळणार दुःखाचा डोंगर ! 26 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा वाईट काळ सुरु होणार, काय काळजी घ्याल?
- गुड न्यूज ! MPSC कडून पहिल्यांदाच एवढी मोठी भरती, ‘या’ पदाच्या 2 हजार 795 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, कोणाला अर्ज करता येणार ? वाचा….
- श्रीरामपूर बाजार समितीत कांदा शेतकऱ्यांची फसवणूक; व्यापाऱ्यांचे संगनमत, शेतकरी संघटना आक्रमक
- अहिल्यानगरच्या ‘या’ बाजारसमितीने नाशिक विभागात पटकावला दुसरा क्रमांक, तर जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा ठरली अव्वल!
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ; पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचे उदघाट्न, ‘या’ Railway स्थानकावरून धावली !