संगमनेर :- काँग्रेसमध्ये सत्तेची अनेक महत्त्वाची पदे ज्यांनी सांभाळली, ज्यांनी अनेकदा स्वकियांनाच त्रास देत सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकूमशाही राबवली, त्यांची दादागिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे.
आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले, आता तुम्ही निर्णय द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांनी सांगितले.

जोर्वे या आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गुरुवारी झालेल्या प्रचाराच्या बैठकीत जगताप बोलत होते.

जगताप म्हणाले, गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने सत्तेत राहून ‘त्या’ परिवाराने अनेक पदे भोगली, पण पक्षाशी कधी निष्ठा दाखवली नाही. वेळ आली तशी पाठ फिरवली. दक्षिणेत त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवली आहे.
आता उत्तरेतील जनतेला संधी आहे. या घराण्याची दादागिरी व हुकूमशाही कायमची संपवा. काँग्रेसने कायम सर्वांना घेत विकासाचे राजकारण केले आहे.

मात्र, याला हे घराणे अपवाद ठरले. जिल्ह्यातून यांना कायमचे हद्दपार करायचे आहे. आमदार भाऊसाहेब कांबळेंसारखा गरीब माणूस काँग्रेसने उमेदवार दिला. यांना साधी व प्रामाणिक माणसे चालत नाहीत.
विखे कुटुंबाची हाजीहाजी करणारेच लागतात. म्हणून आमदार कांबळे यांच्या विरोधात ते उभे ठाकले, असेही आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी सांगितले.
- Weekly Numerology: तुमचा मुलांक तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणार? या आठवड्यात घडणार ‘हा’ मोठा बदल… वाचा या आठवड्यातील मोठी भविष्यवाणी
- Sarkari Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता पिंक रिक्षा! राज्यातील 10000 महिलांना मिळणार स्वतःची पिंक ई-रिक्षा… जाणून घ्या योजनेचा तपशील
- लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत, कारण….
- शिर्डी, अक्कलकोट, गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी नवीन बससेवा सुरु ! कस आहे वेळापत्रक ? रूट पहा…
- सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त 200 दिवसात 8 व्या वेतन आयोगाची भेट मिळणार ! नव्या वेतन आयोगाबाबत समोर आले मोठे अपडेट