अकोले :- तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे (३६) या तरुण शेतकऱ्याने २३ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर राजूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना मृताकडे एक चिठ्ठी मिळून आली होती. यातील मजकुरावरून एक आरोपी विलास दादाजी गोसावी यास अटक केली.

त्याला न्यायालयानेसहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील आरोपी धुतडोकार दाजी, विनायक चोथवे, संतोष मुतडक व प्रा. बादशहा नारायण ताजणे यासह अन्य आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी मृत शेतकऱ्याजवळल मिळालेल्या चिठ्ठीतील मजकूराबाबत मृताचे नातेवाईकांना अंधारात ठेवून अकस्मात मृत्यूची नोंद केली.
या घटनेला आता पाच दिवस उलटल्यावर मृताच्या भावजय व नातेवाईकांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला.
त्यांनी या घटनेतील मृत शेतकरी आरोटे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे पोलिसांना दिली.
- स्पोर्टी डिझाइन आणि पॉवरफुल इंजिन! नवीन Kawasaki Ninja 650 भारतात लाँच;किंमत आणि वैशिष्ट्ये ऐकून व्हाल खुश
- Indias EV Market : भारतीयांना ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारने लावलं वेड, एका महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्री; ऑटो बाजारात बादशाह ठरलेली ही कार कोणती?
- ह्युंदाई अल्काझारला टक्कर देण्यास मारुती सज्ज; Grand Vitara 7-Seater चे रेंडर झाले लीक, पाहा किंमत काय असणार?
- हापुस आंब्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण ! आता डझनभर आंबे मिळणार फक्त ‘इतक्या’ रुपयात ! वाचा सविस्तर
- Ahilyanagar Politics : ॲड.प्रताप ढाकणे करणार भाजपमध्ये प्रवेश ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राजकीय चर्चांना उधाण