अकोले :- तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे (३६) या तरुण शेतकऱ्याने २३ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर राजूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना मृताकडे एक चिठ्ठी मिळून आली होती. यातील मजकुरावरून एक आरोपी विलास दादाजी गोसावी यास अटक केली.

त्याला न्यायालयानेसहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील आरोपी धुतडोकार दाजी, विनायक चोथवे, संतोष मुतडक व प्रा. बादशहा नारायण ताजणे यासह अन्य आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी मृत शेतकऱ्याजवळल मिळालेल्या चिठ्ठीतील मजकूराबाबत मृताचे नातेवाईकांना अंधारात ठेवून अकस्मात मृत्यूची नोंद केली.
या घटनेला आता पाच दिवस उलटल्यावर मृताच्या भावजय व नातेवाईकांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला.
त्यांनी या घटनेतील मृत शेतकरी आरोटे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे पोलिसांना दिली.
- iPhone 18 Pro आणि Pro Max बद्दल मोठी अपडेट! सप्टेंबर 2026 मध्ये लाँच, पहिला फोल्डेबल आयफोनही येणार?
- सूर्यप्रकाशावर चार्ज होणारी इलेक्ट्रिक कार! Nissan Ariya Solar Concept ने उघडली भविष्यातील ईव्हीची नवी वाट
- मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटांत! हाय-स्पीड रेल्वेने महाराष्ट्राच्या दळणवळणात ऐतिहासिक बदल
- खाजगी वाहनांसाठी FASTag वरून ‘KYV’ अट रद्द; 1 फेब्रुवारी 2026 पासून नवीन नियम लागू
- १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींना मंजुरी; ८ व्या वेतन आयोगाबाबत प्रतीक्षा कायम













