शिर्डी :- राष्ट्रवादीकडून आम्ही निवडणूक लढवली असती तर ती राजकीय आत्महत्याच ठरली असती,’ अशा शब्दांत माजी विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षावर नाराजीचे कारण शनिवारी जाहीरपणे सांगितले.
‘नगरची जागा काँग्रेसला सुटल्यास पक्षाचा एक खासदार वाढेल म्हणून मी जिवाचे रान करीत हाेताे. त्याच वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र सुजयने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा सल्ला देत होते.

दरम्यान विधानसभेच्या विराेधी पक्षनेतेपदाचा महिनाभरापूर्वीच राजीनामा पक्षाकडे दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
विखेंचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अापली भूमिका मांडली.
ते म्हणाले,आम्ही नगरची जागा सुजयसाठी मागत हाेताे. मात्र राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक ही काँग्रेससाठी सोडली नाही. याविराेधात काँग्रेसमधील काही नेतेही सहभागी झाले हाेते.
या विषयावर मी राहुल गांधींना भेटणार हाेताे, त्याच दिवशी शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विखे पाटील कुटुंबाबाबत आपली खुन्नस जाहीररीत्या बोलून दाखवली.
आमच्या वडिलांबाबत अनावश्यक विधाने केली. त्यानंतर काँग्रेस पक्षाध्यक्षांनीही सुजयला राष्ट्रवादीत पाठवण्याचा मला सल्ला दिला.
परंतु, राष्ट्रवादीची आमच्याबाबतची पूर्वग्रहदूषित मानसिकता लक्षात घेता त्या पक्षाकडून सुजयने निवडणूक लढवणे ही राजकीय आत्महत्या ठरली असती,’ असे स्पष्टीकरण विखेंनी दिले.
- दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची नवीन तारीख जाहीर !
- CSIR NEERI Bharti 2025: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! राज्यातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ १० रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन Railway
- 18GB RAM, वॉटरप्रूफ डिझाइन आणि दमदार फीचर्स; Realme चा नवाकोरा फोन फक्त ₹15,999 मध्ये खरेदी करण्याची संधी!
- मुंबईला मिळणार दुसऱ्या बुलेट ट्रेनची भेट ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार बुलेट ट्रेन, 767 किलोमीटर लांबीच्या कॉरिडोरवर 11 स्थानके