शिर्डी :- राष्ट्रवादीकडून आम्ही निवडणूक लढवली असती तर ती राजकीय आत्महत्याच ठरली असती,’ अशा शब्दांत माजी विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षावर नाराजीचे कारण शनिवारी जाहीरपणे सांगितले.
‘नगरची जागा काँग्रेसला सुटल्यास पक्षाचा एक खासदार वाढेल म्हणून मी जिवाचे रान करीत हाेताे. त्याच वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र सुजयने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा सल्ला देत होते.

दरम्यान विधानसभेच्या विराेधी पक्षनेतेपदाचा महिनाभरापूर्वीच राजीनामा पक्षाकडे दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
विखेंचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अापली भूमिका मांडली.
ते म्हणाले,आम्ही नगरची जागा सुजयसाठी मागत हाेताे. मात्र राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक ही काँग्रेससाठी सोडली नाही. याविराेधात काँग्रेसमधील काही नेतेही सहभागी झाले हाेते.
या विषयावर मी राहुल गांधींना भेटणार हाेताे, त्याच दिवशी शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विखे पाटील कुटुंबाबाबत आपली खुन्नस जाहीररीत्या बोलून दाखवली.
आमच्या वडिलांबाबत अनावश्यक विधाने केली. त्यानंतर काँग्रेस पक्षाध्यक्षांनीही सुजयला राष्ट्रवादीत पाठवण्याचा मला सल्ला दिला.
परंतु, राष्ट्रवादीची आमच्याबाबतची पूर्वग्रहदूषित मानसिकता लक्षात घेता त्या पक्षाकडून सुजयने निवडणूक लढवणे ही राजकीय आत्महत्या ठरली असती,’ असे स्पष्टीकरण विखेंनी दिले.
- BSF Sports Quota Jobs 2025: सीमा सुरक्षा दलात 241 जागांसाठी भरती सुरू! लगेच अर्ज करा
- ‘या’ आहेत 2025 मधील भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कार ! यादीतली सर्वात स्वस्त कार फक्त 4.23 लाखांना, पहा संपूर्ण यादी….
- मार्केट कॅपिटलनुसार भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्या ! पहिल्या नंबरवर कोण ? पहा संपूर्ण यादी
- महाराष्ट्रातील 1ली ते 10वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या राहणार
- पंतप्रधान मोदीनी मन की बात मधून ऐतिहसिक घटनेचा आनंद द्विगुणीत केला-ना.विखे पाटील